परवाच कॉलेजचे शेवटचे काम ( TC\LC काढला) केले..आणी काय झाले कळलेच नाही.. दिवसभर वेगळ्याच मनस्थितीत होतो... काहीतरी हरवलेय असे वाटत होते..पण मी मात्र ते शोधायला तयार नव्हतो..ती समोरुन निघुन गेली यावेळेशी मी तिला थांबवले नाही किंवा बोललो नाही..शेवटी निघालो.. गाडीत बसलो आणी मग मात्र मन भरुन आले..
कळणार कसे सखे तुला
भाव माझ्या मनाचे.
तुझा तरी काय दोष त्यात
मी कधी बोललोच नाही....
खुपदा ठरवले होते तुला
सर्व काही सांगायचे.
वेळ निघुन गेली प्रत्येकदा
पण कधी धीरच झाला नाही....
कॉलेज नसतानाही येत होतो
मी फक्त तुझ्याचसाठी.
कित्येकदा समोरुन गेलीस तु
पण कधी थांबवूच शकलो नाही....
मन माझे वेडे होते
तुला शब्दाविना कळण्याची वाट पाहत राहीले.
त्या भावना शेवटी माझ्याकडेच
तुला त्या कधी कळल्याच नाही....
आता जात आहे कायमचा
तु परत दिसण्याचीही शक्यता नाही.
तु समोर असुन ही मी निघालो
तुझा साधा निरोपही घेतला नाही......
~निशिगंध
Tuesday, September 15, 2009
Subscribe to:
Posts (Atom)