Monday, June 1, 2009

माझा एक मित्र आहे र.....
(नाव नको उगीच लफडा)

असो आम्ही सर्व जण म.टेक (M.Tech) ला एकत्र आलो. आणी आम्हाला आमच्यातील साम्य कळले. कुणालाही (काही लहान अपवाद) आतापर्यंत एकपण मैत्रीण नाही. (आता या क्षणी असेल तर मात्र मला माहीत नाही).
प्रत्येकाचा प्रेमाशी काडीचाही संबध नव्हता. पण म.टेक ला आल्यावर प्रत्येकाने निदान एक तरी प्रयत्न मात्र केला. मला अजुन आठवतात ते जादुई तीन दिवस. सलग तीन दिवस तीन प्रपोज. (तीन मुली आणी तीन मुले ). प्रत्येकाची नविनच गोष्ट.


आता या र.....ला एक मुलगी आवडली. खुप दिवस आवडली होती. पण आम्हाला त्याने सांगीतले उशीरा. त्याला असे वाटायचे की, ती मुलगी आपल्याकडेच पाहते. मग खुप दिवस तळमळुन काढल्यावर असे ठरले की, ती नाही म्हटली तरी चालेल पण निदान तीला सांगायला तरी पाहीजे. ( आमच्या सर्वांची कॉमन थेयरीच आहे ना.)
..........

.............
....................
.............................
तोपर्यंत खुप वेळ निघुन गेलेला. त्यांची परीक्षा संपलेली आणी ती घरी निघालेली. तीला हाक मारली व र.... तीच्या मागे मागे निघाला. ती थांबायलाच तयार नाही. शेवटी थांबली पण तीच्या तीन मैत्रीणीही थांबल्या. जवळच आमच्या प्युन अप्पा झाडुकाम करत होता. त्याने ही काम थांबवुन दिले व मजा बघत राहीला...

पुढे काय ते वाचा माझ्या कवितेत....

खुप दिवस चालला लपंडाव आपल्या नजरेचा.
नुसतेच पाहत होतो चोरुन एकमेकांना.

खुप विचार करुन शेवटी एक दिवस ठरवला.
पण तोही बिच्चारा तुझा घरी जायचाच निघाला.

परत कोण वाट बघा म्हणून तुला तसेच अडवले.
तीन मैत्रीणी आणि अप्पाही विनाकारण थबकले.

ठरवले मग कशाला चार प्रे़क्षकांना भ्यायचे.
थांबवले आहे तर आता पुर्णच लढायचे.

तीनदा विचारले तरी तिला प्रश्नच कळाला नाही.
"मला गावाला जायचे आहे" शिवाय काहिच बोलली नाही.

पण शेवटी मी गणिमी काव्याने हरलो.
असे विचित्र उत्तर ऐकुन कुठलाच नाही उरलो.

असे परत एकुण तीन प्रयत्न झाले.
प्रश्न तोच पण उत्तर वेगवेगळेच मिळाले.

कधि म्हणाली " मी तुम्हाला एकदा सांगितले ना".
तर कधि म्हणाली "कोन आपण,मी ओळखले नाही".

आता आला दिवस काढतो आहे, प्रयत्नही करतोच आहे.
उत्तरे मिळाली इतकी सारी, अर्थ त्यांचे काढतो आहे.

__ निशिगंध

3 comments: